आषाढी एकादशी 2025 निमित्त महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून तमाम वारकरी पंढरपूरला जावून विठ्ठल रुखुमाईचे दर्शन घेत असतात. पंढरपूरला जावून विठ्ठल रुखमाईचे दर्शन घेण्याची प्रत्येकाचीच इच्छा असते मात्र जाण्याच्या सोयीमुळे अनेकांना आपल्या इच्छेवर पाणी सोडावे लागते.
आषाढी एकादशी 2025 निमित्त पंढरपूरला जाणाऱ्यांमध्ये ग्रामीण भागातील भाविकांची संख्या खूप मोठी असते.
ग्रामीण भागातील भाविकांचा पंढरपूर वारीचा विचार करून महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ आता पंढरीच्या वारीसाठी गावातूनच बस उपलब्ध करून देणार आहे. या संदर्भात माहिती राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी त्यांच्या एक्स या समाजमाध्यमांवर दिली आहे.
पंढरपूरला जाण्यासाठी गावातूनच बस कशी मिळेल
महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री यांनी दिलेल्या माहितीनुसार एका गावातून कमीत कमी 40 लोकांनी बसची मागणी केली तर त्यांना त्यांच्या गावातूनच बस उपलब्ध करून दिली जाणार आहे. यामुळे पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी खूप सुविधा होणार आहे.
मागील वर्षी म्हणजेच 2024 मध्ये जवळपास 8 लाख भाविकांनी पंढरपूर येथे आषाढी एकादशी निमित्त भेट दिली होती. यावर्षी यामध्ये अजून दोन लाख भाविक वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
बसद्वारे पंढरपूरला जातांना ग्रामीण भागातील भाविकांना खूप खटाटोप करावा लागतो. गर्दी मोठ्या प्रमाणात असल्याने गाडीत बसण्यास जागा मिळत नाही पर्यायाने वृद्ध भाविकांना मोठ्या कष्टाने प्रवास करावा लागतो.
हि गैरसोय टाळण्यासाठी आता तुमची तुमच्या गावातून 40 जणांचा ग्रुप केला तर गावातच बस उपलब्ध करून दिली जाणार आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या या सुविधेमुळे भाविकांना आरामदायक प्रवास मिळणार आहे.
गावात बस उपलब्ध करून दिली तरी शासनाच्या सर्व सुविधा लागू
40 जणांच्या ग्रुपने मागणी केल्यानंतर गावातच बस उपलब्ध करून दिली जात असल्याने शासनाच्या प्रवासाच्या सवलती मिळतील का असा प्रश्न पडत असेल तर नक्कीच होय.
गावात उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या बसमधील प्रवासामध्ये देखील अमृत ज्येष्ठ नागरिक योजना व महिला सन्मान योजना लागू असणार आहे.
अमृत ज्येष्ठ नागरिक योजना अंतर्गत 75 वर्षावरील नागरिकांना मोफत प्रवास मिळतो तर महिला सन्मान योजना अंतर्गत महिलांना बस प्रवास भाड्यामध्ये 50 टक्के सवलत दिली जाते. या दोन्ही योजना गावात उपलब्ध करून दिलेल्या बस मध्ये लागू करण्यात आल्या आहेत.
आषाढी यात्रा सोहळा निमित्त महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाकडून 5 हजार 200 विशेष बस सोडल्या जाणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी आषाढी एकादशी 2025 योजनेचा जरूर लाभ घ्यावा.
आषाढी एकादशी निमित्त गावात बस उपलब्धतेबाबतची थोडक्यात माहिती
सगळ्यात आधी महत्वाचे म्हणजे हि कोणती योजना नाही तर नागरिकांसाठी शासनाच्या वतीने सुविधा करून देण्यात आली आहे.
घटना. | आषाढी एकादशी 2025. |
सुविधा. | भाविकांना गावातच उपलब्ध करून दिली जाणार बस. |
अट. | गावातून कमीत कमी 40 जणांनी बसची बुकिंग करणे गरजेचे. |
बस योजनेचा मिळणार का? | होय. गावात जरी बस उपलब्ध करून देण्यात आली तरी यामध्ये जेष्ठ नागरिकांना मोफत प्रवास व महिलांना ५० टक्के भाडे सवलत योजनेचा लाभ मिळेल. |
विभाग. | महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ. |
कालावधी. | आषाढी एकादशीपर्यंत. |
संपर्क | तुमच्या तालुक्यातील एसटी बस स्थानक कार्यालयात संपर्क साधा. |
अशा प्रकारे तुम्हाला देखील आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे जायचे असेल तर तुम्ही तुमच्या गावामध्ये कमीत कमी 40 भाविकांचा गट करून त्यांची बुकिंग करणे गरजेचे आहे.