मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना संदर्भात मोठे अपडेट. आता सर्व शेतकऱ्यांना मिळणार सौर पंप फडणवीस यांची घोषणा

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना संदर्भात मोठे अपडेट. आता सर्व शेतकऱ्यांना मिळणार सौर पंप फडणवीस यांची घोषणा

जाणून घेवूयात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना संदर्भात सविस्तर माहिती.

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांची एक दिवसीय परिषद पार पाडण्यात आली. या परिषदेमध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 चे लोकार्पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

या योजनेतून शेतकरी बांधवाना दिवसा वीज उपलब्ध करून देणे हा या योजनेचा उद्देश आहे. शेतकरी बांधवांसह उद्योजकांना देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे.

महाराष्ट्रातील सुमारे ४५ लाख शेती वीज पंपांची संख्या ही देशात सर्वाधिक आहे. राज्यातील एकूण विजेच्या वापरापैकी २२ टक्के वीज वापर शेतीसाठी होतो. त्यामुळे शेतकरी बांधवांसाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना खूपच लाभदायी ठरणार आहे.

संपूर्ण भारतवर्षामध्ये अपारंपरिक ऊर्जेच्या वापरासाठी ४५० गिगाव्हॅट क्षमता २०३० पर्यंत उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्या दृष्टीने देखील मिशन २०२५ ची अंमलबजावणी महत्त्वाची ठरेल.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना. काय आहे मिशन २०२५

याद्वारे फक्त शेतीसाठी आणि एका राज्यात ७ हजार मेगावॅट पेक्षा जास्त सौर ऊर्जा निर्मिती करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. इतर अनेक क्षेत्राप्रमाणे शेती क्षेत्रही विजेच्या मागणीत देशभरात अग्रेसर असून देशाने अपारंपरिक ऊर्जेच्या वापरासाठी ४५० गिगाव्हॅट क्षमता २०३० पर्यंत उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्या दृष्टीने देखील मिशन २०२५ ची अंमलबजावणी महत्त्वाची ठरेल.

अधिक माहितीसाठी खालील व्हिडीओ पहा

याद्वारे फक्त शेतीसाठी आणि एका राज्यात ७ हजार मेगावॅट पेक्षा जास्त सौर ऊर्जा निर्मिती करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. इतर अनेक क्षेत्राप्रमाणे शेती क्षेत्रही विजेच्या मागणीत देशभरात अग्रेसर असून

शेतीला परवडणाऱ्या दरात वीज मिळावी यासाठी शासनाकडून दरवर्षी मोठ्या प्रमाणात  अनुदान तर दिले जाते. याशिवाय वीज वितरण कंपनीच्या इतर ग्राहकांकडून क्रॉस सबसिडी देखील दिली जाते.

शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात वीज पुरवठा सुरळीत केला जातो. भविष्यामध्ये क्रॉस सबसिडीच्या माध्यमातून शेतीचे वीजदर मर्यादित ठेवण्यावर मोठ्या प्रमाणात मर्यादा येणार आहे.

त्यादृष्टीने वीज ग्राहक, शेतकरी व वीज वितरण कंपनी या सर्वांच्या हिताची अशी ही योजना आहे. शेतकऱ्यांच्या शेतीपंपांना दिवसा अखंडीत व भरवशाचा वीज पुरवठा करण्यासाठी हे अभियान आहे.

पुढील योजनेची माहिती पण पहा सौर कृषी पंप 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरु

डिसेंबर २०२५ पर्यंत ३० टक्के शेतीच्या वाहिन्या सौर ऊर्जेवर चालणार

मिशन २०२५ च्या माध्यमातून हि योजना अजून महत्त्वाकांक्षीपणे मोठ्या प्रमाणात व वेगाने अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मिशन २०२५ द्वारे डिसेंबर २०२५ पर्यंत सर्व जिल्ह्यातील किमान ३० टक्के शेतीच्या वाहिन्या अशा प्रकल्पांद्वारे सौर ऊर्जेवर आणण्याचे उद्दिष्ट असून ‘मिशन २०२५’ द्वारे शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी अनेकविध प्रोत्साहनात्मक सुविधा देण्यात आल्या आहेत.

या प्रकल्पांतर्गत शेतकरी बांधवाना दर हेक्टरी एक लाख २५ हजार रुपये दरवर्षी एवढा भाडेपट्टा देण्याची तरतूद आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना खात्रीच्या उत्पन्नाचा एक मार्ग उपलब्ध होऊ शकेल.

महाराष्ट्रामध्ये शेतकरी बांधवाना शेतीमध्ये सगळ्यात मोठा अडथळा जर कोणता असेल तर तो म्हणजे खंडित वीज पुरवठा होय. केवळ विजेअभावी शेतकरी बांधव त्यांच्या शेतातील पिकांना पाणी पुरवठा करू शकत नाहीत. त्यामुळे अनेक शेतकरी बांधव सौर कृषी पंप योजनेकडे वळेलेले आहेत.

तर अशा पद्धतीने आपण मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेतली आहे.

अधिकृत माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

अधिकृत माहिती लिंक.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना काय आहे?

या लेखामध्ये या योजना संदर्भात सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे.

कधी पासून सुरु झाली मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी २.० योजना.

दिनांक २५ एप्रिल रोजी या योजनेचे लोकार्पण करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *