Gram suraksha scheme पोस्ट ऑफिसची हि योजना एकदम जबरदस्त

Gram suraksha scheme पोस्ट ऑफिसची हि योजना एकदम जबरदस्त

आज आपण gram suraksha scheme योजना संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. भारतीय पोस्ट ऑफिसच्या indian post office अनेक योजना अशा असतात ज्या कि खूप फायदा देतात. आज आपण जाणून घेणार आहोत कि भारतीय डाक विभागाची अशी कोणती योजना आहे ज्यामुळे तुम्हाला जास्त लाभ होऊ शकतो.

व्हॉट्सॲप ग्रुप लिंक

आयुष्याच्या शेवटच्या वळणार जेंव्हा आपण पोचतो त्यावेळी पैसा जवळ असणे खूप महत्वाचे असते. त्यामुळे भविष्याचा विचार करून आतापासून आपण बचत करायला सुरुवात केली पाहिजे जेणे करून पुढे आपल्याला अडचण येणार नाही.

पुढील योजनेविषयी पण वाचा वनधन विकास योजना

Gram suraksha scheme ग्रामीण नागरिकांसाठी उत्तम योजना.

बऱ्याच योजना असतात ज्यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही बचत करू शकता. आज आपण पोस्ट ऑफिसच्या योजना अशाच एका योजना विषयी जाणून घेणार आहोत. या योजनेचा ग्रामीण भागातील नागरिकांना भरपूर फायदा मिळू शकणार असल्याने हि योजना नक्कीच तुम्हाला आवडेल.

पोस्ट ऑफिसच्या बऱ्याच योजना अशा आहेत कि ज्या तुम्हाला भरपूर लाभ मिळवून देवू शकतात. पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये पैसे गुंतवणूक करणे म्हणजेच बचतीचा खात्रीशीर पर्याय मानला जातो.

Gram suraksha scheme संपूर्ण माहिती बघा.

भारतीय डाक विभागाच्या म्हणजेच पोस्ट विभागाच्या ग्राम सुरक्षा पॉलिसी योजना संदर्भात आपण माहिती जाणून घेणार आहोत. ग्रामीण पोस्टल जीवन विमा अर्थात rural postal life insurance या योजना अंतर्गत या ग्राम सुरक्षा योजना gram suraksha scheme  राबविली जाते. ग्रामीण भागातील नागरिकांना या योजनेचा विशेष लाभ मिळू शकतो.

ग्रामीण पोस्टल जीवन विमा म्हणजेच rural postal life insurance अंतर्गत राबविल्या या ग्राम सुरक्षा पॉलिसी योजना विषयी सविस्तर महिती भारतीय डाक विभागाच्या संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे.

gram suraksha scheme

ग्राम सुरक्षा पॉलिसी योजनेची वैशिष्ट्य.

  • कमीत कमी १९ व जास्तीत जास्त ५५ वर्षांची व्यक्ती या योजनेसाठी पात्र आहे.
  • या योजनेमध्ये कमीत कमी १० हजार व जास्तीत जास्त १० लाख रुपये गुंतविले जावू शकतात.
  • विमा हफ्ता व्यवस्थित भरणा सुरु असेल तर ४ वर्षानंतर लोन सुविधा देखील मिळते.
  • तुमची इच्छा असेल तर ३ वर्षाच्या नंतर पोलिसी बंद करता येते.
  • नियमित ग्राम सुरक्षा पॉलिसी सुरु ठेवणाऱ्या ग्राहकांना बोनस दिला जातो. परंतु पॉलिसी धारकांनी ५ वर्षाच्या आत सरेंडर केले म्हणजेच पॉलिसी बंद केली तर मात्र त्यांना बोनस दिला जात नाही.

ग्राम सुरक्षा पॉलिसी योजनेची अधिक माहिती मिळविण्यासाठी भारतीय डाक विभागाच्या वेबसाईटला भेट द्या. डायरेक्ट वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *