मंत्रीमंडळ बैठकीमध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना savitribai fule gharkul yojana मंजूर करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागात विशेषत: मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्गासाठी हि योजना आहे.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना savitribai fule gharkul yojana राबवण्यास मंत्रिमंडळ बैठकीत नुकतीच मान्यता देण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील राज्यातील ग्रामीण भागात २० लाभार्थ्यांकरिता एक वसाहत निर्माण करण्यात येणार आहे.
एका वसाहतीस अंदाजे ८८.६३ लाख खर्च येईल. या वसाहतींना सर्व नागरी सुविधा देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे.
१० कुटुंबांसाठी ४४.३१ लाख एवढा खर्च एका वसाहतीसाठी येणार आहे. घरकुल बांधकाम करण्यासाठी प्रति लाभार्थी १.२० लाख रुपये निधी निधी मिळेल.

पुढील योजना पण बघा सरकार गेले आता काय होणार ५० हजार प्रोत्साहन अनुदानाचे
जे लाभार्थी या योजनेसाठी निवडले जाणार आहेत त्यांची जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समिती लाभार्थी निवडेल.
या आर्थिक वर्षात वसाहतीसाठी तसेच वैयक्तिक घरकुलांसाठी ३० कोटी रुपये एवढा निधी लागणार आहे.
ग्रामीण भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणातील नागरिकांकडे घरे नसल्यामुळे त्यांची कुचंबना होत आहे. अशावेळी अशा नागरिकांना जर हक्काचे घरकुल मिळाले तर नक्कीच त्यांना याचा फायदा होऊ शकतो.
या योजनेविषयी अधिकृत माहिती शासनाच्या महासंवाद या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेली आहे.

दादाराव गावंडे हे digitaldg.in चे संस्थापक असून 2018 पासून महाराष्ट्रातील सरकारी योजना, शेतकरी योजना, महिला योजना आणि बांधकाम कामगार विषयांवर माहितीपर लेखन करत आहेत. ते शासन निर्णय (GR) आणि अधिकृत माहितींवर आधारित अचूक व सोप्या भाषेत माहिती देण्यावर भर देतात. ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत सरकारी योजनांची योग्य माहिती पोहोचवणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे.