पीएम किसान सन्मान निधी इकेवायसी 2026 संदर्भात एक नवीन अपडेट आले आहे. देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणारी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM-KISAN) आणि महाराष्ट्र शासनाची नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन महत्त्वाच्या योजना आहेत.
या दोन्ही योजनांमधून पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी एकूण 12 हजार रुपये मिळतात.
मात्र हा लाभ नियमितपणे मिळत राहण्यासाठी पीएम किसान सन्मान निधी इकेवायसी २०२६ पूर्ण करणे आता अनिवार्य करण्यात आले आहे. शासनाने 30 जून 2026 ही अंतिम तारीख दिली असून, या तारखेपूर्वी eKYC पूर्ण न केल्यास पुढील हप्ता मिळण्यास अडचण येऊ शकते.
या लेखात आपण मोबाईलवरून eKYC कशी करायची, कोणती कागदपत्रे लागतात आणि eKYC स्टेटस कसे तपासायचे याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
खालील योजनेचा पण लाभ घ्या.
पोकरा शेळीपालन योजना २०२६: विधवा आणि भूमिहीन महिलांसाठी आर्थिक स्वावलंबनाची सुवर्णसंधी
पीएम किसान सन्मान निधी इकेवायसी 2026 का महत्त्वाची आहे?
केंद्र सरकारने लाभार्थ्यांची ओळख निश्चित करण्यासाठी eKYC प्रक्रिया अनिवार्य केली आहे. यामुळे बनावट लाभार्थ्यांना आळा बसतो आणि पात्र शेतकऱ्यांपर्यंतच निधी पोहोचतो.
जर तुमची eKYC पूर्ण नसेल तर:
- पीएम किसानचा ₹2,000 चा हप्ता थांबू शकतो.
- नमो शेतकरी योजनेचा लाभ देखील मिळणार नाही.
- लाभार्थी यादीतून नाव तात्पुरते वगळले जाऊ शकते.
पुढील हप्ते बँक खात्यात जमा होण्यास विलंब होऊ शकतो.
खालील माहिती पण कामाची आहे.
विहीर पुनर्भरण करा रोजगार हमी योजना मधून.
एका eKYC ने मिळतात दोन योजनांचे लाभ
पीएम किसान सन्मान निधी इकेवायसी 2026. अनेक शेतकऱ्यांना वाटते की पीएम किसान आणि नमो शेतकरी या दोन्ही योजनांसाठी स्वतंत्र प्रक्रिया करावी लागते. प्रत्यक्षात तसे नाही.
पीएम किसान योजनेची eKYC पूर्ण केल्यानंतर त्याच डेटाचा वापर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी देखील केला जातो.
वार्षिक मिळणारा लाभ.
| योजना | वार्षिक लाभ |
| पीएम किसान सन्मान निधी | ₹6,000 |
| नमो शेतकरी महासन्मान निधी | ₹6,000 |
| एकूण लाभ | ₹12,000 |
त्यामुळे पीएम किसान सन्मान निधी इकेवायसी २०२६ पूर्ण करणे म्हणजे दोन्ही योजनांचा लाभ सुरक्षित करणे होय.
मोबाईलवरून eKYC करण्यासाठी काय आवश्यक आहे?
घरबसल्या eKYC करण्यासाठी खालील गोष्टी आवश्यक आहेत.
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड.
- आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर.
- इंटरनेट सुविधा.
- अँड्रॉइड स्मार्टफोन.
आवश्यक ॲप्स
महत्त्वाची बाब म्हणजे Aadhaar Face RD हे ॲप बॅकग्राऊंडमध्ये काम करते. त्यामुळे त्याचे स्वतंत्र आयकॉन मोबाईलमध्ये दिसणार नाही.
मोबाईलवरून PM Kisan eKYC कशी करावी?
खालील स्टेप्स फॉलो करून तुम्ही काही मिनिटांत eKYC पूर्ण करू शकता.
स्टेप 1: PM Kisan App उघडा
सर्वप्रथम PM Kisan Mobile App डाउनलोड करून उघडा.
स्टेप 2: Facial e-KYC Login निवडा
मुख्य पानावर दिसणाऱ्या “Facial e-KYC Login” या पर्यायावर क्लिक करा.
स्टेप 3: आधार क्रमांक टाका.
तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाका आणि पुढे जा.
स्टेप 4: M-PIN तयार करा.
पहिल्यांदाच लॉगिन करत असल्यास 6 अंकी M-PIN तयार करा.
स्टेप 5: फेस ऑथेंटिकेशन पूर्ण करा.
मोबाईल कॅमेरा सुरू झाल्यानंतर:
- चेहऱ्यावर योग्य प्रकाश ठेवा.
- कॅमेऱ्याकडे सरळ पहा.
- डोळे मिचकावा (Blink Eyes).
- चेहरा स्थिर ठेवा.
फेस स्कॅन यशस्वी झाल्यानंतर eKYC प्रक्रिया पूर्ण होईल.
eKYC स्टेटस कसे तपासावे?
eKYC पूर्ण झाल्यानंतर PM Kisan App मधील Dashboard मध्ये खालील तीन बाबी तपासा.
Green Yes दिसणे आवश्यक.
Land Record Seeding.
Aadhaar Bank Account Seeding.
e-KYC Status.
या तिन्ही ठिकाणी Green Yes दिसत असल्यास तुमची प्रक्रिया यशस्वी झाली आहे.
30 जून 2026 पूर्वी eKYC का करावी?
अनेक शेतकरी शेवटच्या तारखेपर्यंत वाट पाहतात. त्यामुळे सर्व्हरवर ताण येतो आणि तांत्रिक अडचणी निर्माण होतात.
वेळेत eKYC पूर्ण केल्यास:
- हप्ता अडकण्याचा धोका कमी होतो.
- बँक खात्यात रक्कम वेळेवर जमा होते.
- सीएससी केंद्रावर जाण्याची गरज राहत नाही.
- अतिरिक्त खर्च वाचतो.
म्हणून शेवटच्या दिवसाची वाट न पाहता आजच पीएम किसान सन्मान निधी इकेवायसी २०२६ पूर्ण करा.
इतर शेतकऱ्यांची eKYC करू शकता का?
होय.
PM Kisan App मध्ये “e-KYC for Other Beneficiaries” हा पर्याय उपलब्ध आहे.
या सुविधेच्या मदतीने तुम्ही:
- वृद्ध शेतकऱ्यांना मदत करू शकता.
- मोबाईल वापरण्यात अडचण असलेल्या लाभार्थ्यांची eKYC करू शकता.
- आपल्या गावातील पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहणार नाहीत याची काळजी घेऊ शकता.
लेखाचा सारांश
पीएम किसान सन्मान निधी इकेवायसी २०२६ ही केवळ औपचारिक प्रक्रिया नसून आपल्या हक्काचा वार्षिक ₹12,000 निधी सुरक्षित ठेवण्याचा महत्त्वाचा टप्पा आहे.
जर तुम्ही अद्याप eKYC केली नसेल तर त्वरित PM Kisan App च्या मदतीने मोबाईलवरून प्रक्रिया पूर्ण करा. तसेच आपल्या गावातील इतर शेतकरी बांधवांनाही याबाबत माहिती द्या.
30 जून 2026 पूर्वी eKYC पूर्ण करा आणि पीएम किसान तसेच नमो शेतकरी योजनेचा लाभ नियमितपणे मिळवत राहा.
होय. पुढील हप्ते मिळण्यासाठी eKYC अनिवार्य आहे.
30 जून 2026 पर्यंत eKYC पूर्ण करणे आवश्यक आहे.
होय. PM Kisan App आणि Aadhaar Face RD App च्या मदतीने मोबाईलवरून eKYC करता येते.
पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे हप्ते थांबू शकतात.
नाही. पीएम किसानची eKYC पूर्ण झाल्यानंतर त्याच माहितीचा वापर नमो शेतकरी योजनेसाठी केला जातो.

दादाराव गावंडे हे digitaldg.in चे संस्थापक असून 2018 पासून महाराष्ट्रातील सरकारी योजना, शेतकरी योजना, महिला योजना आणि बांधकाम कामगार विषयांवर माहितीपर लेखन करत आहेत. ते शासन निर्णय (GR) आणि अधिकृत माहितींवर आधारित अचूक व सोप्या भाषेत माहिती देण्यावर भर देतात. ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत सरकारी योजनांची योग्य माहिती पोहोचवणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे.