ativrushti anudan 2022 नवीन जिल्ह्यांची यादी आली.

ativrushti anudan 2022 नवीन जिल्ह्यांची यादी आली.

अतिवृष्टी अनुदान ativrushti anudan 2022 संदर्भात नवीन अपडेट. जून ते ऑगस्ट २०२२ या कालावधीत अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या वतीने मदत देण्यात आली.

परंतु यामध्ये असे काही जिल्हे होते ज्यामध्ये नुकसान कमी झालेले आहेत किंवा तांत्रिकदृष्ट्या भाषेत सांगायचे झाल्यास अतिवृष्टीसाठी विहित करण्यात आलेल्या निकषांमध्ये या जिल्ह्यातील शेतकरी बसत नव्हते. अशा शेतकऱ्यांना देखील आता शासनाच्या वतीने मदत मिळणार आहे.

जाणून घ्या असे कोणते जिल्हे आहेत ज्यामध्ये शासनाच्या धोरणानुसार अतिवृष्टी नसतांनाही मदत दिली जाणार आहे.

पुढील लेख पण वाचा. कुसुम सोलर पंप योजना २ लाख पंप उपलब्ध होणार

Ativrushti anudan 2022 नवीन जिल्ह्यांची यादी खालीलप्रमाणे

  1. जालना – ६७८ हेक्टर क्षेत्र बाधित
  2. औरंगाबाद – १२६७९ हेक्टर क्षेत्र
  3. परभणी – २५४५.२५ हेक्टर क्षेत्र
  4. हिंगोली – ९६६७७ हेक्टर क्षेत्र
  5. बीड – ४८.८० हेक्टर क्षेत्र
  6. लातूर – २१३२५१ हेक्टर क्षेत्र
  7. उस्मानाबाद – ११२६०९.९५ हेक्टर क्षेत्र
  8. यवतमाळ – ३६७११.३१ हेक्टर क्षेत्र
  9. सोलापूर – ७४४४६ हेक्टर क्षेत्र

एकूण क्षेत्र – ५ लाख ४९ हजार ६४६.३१ हेक्टर क्षेत्र

एकूण निधी – सुमारे ७५५ कोटी रुपये.

वरीलप्रमाणे विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे. त्यामुळे आता अशा शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे ज्यांचे नाव अतिवृष्टी यादीमध्ये नाही.

पुढील लेख पण वाचा मिनी ट्रॅक्टर योजना ९० टक्के अनुदान मिळणार

७५५ कोटी निधी Ativrushti anudan 2022

विशेष बाब म्हणून ७५५ कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे राज्यातील अंदाजे ५ लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

अनेक गावांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अतिवृष्टीसाठी विहित करण्यात आलेल्या निकषामध्ये बसत नसतानाही वरील जिल्ह्यातील झालेल्या नुकसानीपोटी मदतीचे प्रस्ताव विभागीय आयुक्त औरंगाबाद, अमरावती, सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे सादर केले होते. 

५ लाखांपेक्षा अधिक  शेतकऱ्यांना होणार लाभ.

औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, लातूर, उस्मानाबाद, या जिल्ह्यातील ४ लाख ३८, ४८९ हेक्टर क्षेत्र तर यवतमाळ जिल्ह्यातील ३६,७११.३१ हेक्टर तसेच सोलापूर जिल्ह्यातील ७४,४४६ हेक्टर असे एकूण ५ लाख ४९ हजार ६४६.३१ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.

या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना सुमारे ७५५ कोटी रुपयांच्या निधीची मदत देण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळ उपसमितीने मान्य केला आहे. या निर्णयाचा सुमारे ५ लाखांपेक्षा अधिक  शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.

तर अशा पद्धतीने तम्ही वरील जिल्ह्यातील शेतकरी असाल तर आता हि तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.

Ativrushti anudan 2022 संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

महासंवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *