५० हजार अनुदान वाटप लवकरच होणार सुरु पहा सविस्तर माहिती

५० हजार अनुदान वाटप लवकरच होणार सुरु पहा सविस्तर माहिती

शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी ५० हजार अनुदान वाटप लवकरच होणार सुरु. या योजनेचा कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे आणि कधी मिळणार आहे या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेवूयात.

व्हॉट्सॲप ग्रुप लिंक

जे शेतकरी नियमितपणे कर्ज फेडत आहेत त्यांना ५० हजार अनुदान वाटप केले जाणार आहे. या संदर्भातील जि. आर. देखील काही दिवसापूर्वी काढण्यात आला होता. आता प्रत्यक्षपणे या निर्णयाची अमलबजावणी सुरु होणार आहे आणि नक्कीच हि शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

५० हजार अनुदान वाटप होणार १ जुलैला

उद्धव ठाकरे सरकारने अनेक शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले आहे. परंतु जे शेतकरी नियमित कर्ज फेडतात त्यांचे काय असा प्रश्न उभा राहिला होता. नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये यासाठी महाराष्ट्र सरकारने जे शेतकरी नियमित कर्ज फेडतात त्यांना ५०,००० अनुदान वाटप करण्यात येणार आहे.

१ जुलै रोजी कृषी दिन साजरा केला जातो याच कृषी दिनाचे औचित्य साधून ५० हजार रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केले जाणार आहे.

५० हजार रुपये मिळणार असल्याने अनेक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे. लवकरच मान्सूनचा पाऊस सुरु होणार असल्याने अनेक शेतकरी बांधव शेतीच्या कामाला गुंतलेले आहे.

५० हजार अनुदान वाटप

५० हजार अनुदान वाटप कृषीदिनी

शेतीसाठी बी-बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु झालेली असतांना आता शेतकऱ्यांना कृषी दिनी म्हणजेच १ जुलै रोजी ५० हजार रुपये मिळणार असल्याने शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात खुश झालेला आहे.

शेतकरी बांधवाना शेती करत असतांना बी-बियाणे. खते व शेतीचे इतर साहित्य खरेदी करण्यासाठी पैशांची गरज निर्माण होते. अशावेळी शेतकरी बांधव बँकेचे कर्ज काढतात नैसर्गिक अप्पातीमुळे त्यांनी काढलेले कर्ज ते वेळेवर परत फेड करू शकत नाही. अशावेळी अशा शेतकऱ्यांचे कर्ज थकले जाते.

अशाच थकीत झालेल्या शेतकऱ्यांचे कर्ज नुकतेच महाराष्ट्र शासनाने माफ केले आहे. परंतु काही शेतकरी असे असतात की ते अगदी वेळेवर बँकेची कर्जे फेड करत असतात.

नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना होणार लाभ.

इतर शेतकऱ्यांची थकीत कर्जे माफत होताना ते बघत असतात. अशावेळी आपण नियमित कर्ज परत फेड करून आपला काहीच फायदा झाला नाही अशी भावना त्यांच्या मनांत निर्माण होऊ शकते. परिणामी एक चांगली सवय शेतकरी बांधवानी बंद होऊ शकते.

असे होऊ नये म्हणून महाराष्ट्र शासनाने थकीत झालेल्या शेतकरी बांधवांचे कर्ज माफ करतांनाच जे शेतकरी नियमित कर्ज परत फेड करतील त्यांना प्रोत्साहनपार ५० हजार रुपये एवढे अनुदान देण्यात येईल अशी घोषणा केली होती. यामुळे शेतकऱ्यांना नियमित कर्जाची परतफेड करण्याची सवय लागू शकते जी कि नक्कीच चांगली बाब ठरणार आहे.

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना १ जुलै २०२२ रोजी ५० हजार रुपयांचे अनुदान वाटप केले जाणार असल्याची बातमी शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या संबधित अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

अधिकृत माहिती पहा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *